बुधवार, 18 अगस्त 2021

गावं कशी झालीत गायब नकाशावरुन ?







भुगोलाच्या तासाला

मास्तर घेवून यायचे वर्गात 

गोलाकार फिरणारं जग

सांगायचे जगाच्या नकाशावरचे रहस्य !


'पृथ्वी गोल आहे'

मास्तरांनीच शिकवलं तेव्हा.

आम्ही अंडाकृती फिरत्या जगाला

न्याहाळून पहायचो

उभ्या माणसाची आकृती

'इंडीया'ला शोधायचो.


उष्ण-दमट-थंड आवर्तनं

वेगवेगळे देश आणि अफाट समुद्र

सारं काही निळंशार..

एकोणतीस टक्के भुभागावर

मानवी वस्तीच्या प्रदेशावर, संस्कृतीवर

मास्तर बोलत रहायचे आतून

नकाशावर असलेल्या इंडीयाला पाहून

आमचाही उर यायचा दाटून...


पुढे हाती आला देशाचा नकाशा

प्रदेश आणि आपली आसपासची गावं

दिसू लागलीत ठळक.

जीपीएसने आपलं गाव आणि घर

अधोरेखित झालंय

मास्तरने शिकवलेल्या गोष्टीचं

समजून आलं वलय.


मास्तर,

काळाच्या पुढची भयावह आकृती

हळूहळू होत चाललीय पुसट

जाणवू लागला

वर्तमानाच्या भाषेचा

जंगलातच कोंडमारा




पहाडीवरुन अनवाणी 

उतलेल्या वस्तीचे भाग

कधीतरी येतात

आणि परततात अंधातरी


शेकडो गावं

अबुजमाडच्या टेकडीवरची

कशी झालीत गायब

जगाच्या नकाशावरुन ?


- अविनाश पोईनकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....